Posts

Showing posts from 2021

संविधानिक नैतिकता

Image
बाबासाहेबांचे लोकशाही, संविधान या संदर्भातील एक भाषण काही दिवसांपूर्वी वाचल्याचे आठवते. कदाचित 1953 साल चे असावेत. त्यात आंबेडकर यांनी अख्खं संविधान आणि लोकशाही जणू दोन शब्दात स्पष्ट केली असावी. लोकशाही, संविधान यांचे यश, मर्यादा आणि उत्कर्ष सुद्धा त्या दोन शब्दात बाबासाहेबांनी मांडला असं मला वाटतं. ते शब्द म्हणजे constitutional morality. अर्थात 'संविधानिक नैतिकता '. अख्खी लोकशाही व्यवस्था या दोन शब्दांवर बाबासाहेबांनी उभी केल्या सारखे वाटते. संविधान कितीही श्रेष्ठ असले तरी अंमलबजावणी करणारे त्या पात्रतेचे नसले तर ते प्रभावी ठरत नाही. त्याचं कारण त्यांच्या कडे ती संविधनिक नैतिकता असेलच असे नाही.. आज देशात विविध विचार प्रवाह आहेत. त्यांचे स्थूल पने आपण डावे- उजवे- मध्यम असे वर्गीकरण करतो. पण कोणी कुठ्ल्याही बाजूचा असला तरी, सर्व बाजू संविधानाच्या आत बंदिस्त आहेत. म्हणजे तुम्ही हिंदुत्ववादी असू शकता, पण तुम्ही देशाचे संविधान उलथवून हिंदू धर्म ग्रंथाचे शासन लागू करु शकत नाही. किंवा तूम्ही इस्लाम मूलतत्ववादी असू शकता, पण म्हणून राज्य हे धार्मिक ग्रंथावर चालवू शकत नाही. जे काही अस

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

Image
20 nov ला सायंकाळी मला सागर टेळे या मित्राचा फोन आला. सागर हा Delhi मधे सध्या upsc ची तयारी करतोय. आमची या पूर्वी कधी भेट झाली नव्हती. एक दोन वेळेस फोन वर बोलणे झाले. पण त्याने आम्हीं मेंढपाळ समूहाच्या दृष्टिने जे कार्य करीत आहे. त्याला तो जाणून होता. म्हणूनच त्याने यवत जवळ जोगेश्वरी सिद्धनायक यांच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण धाडले. मित्राची Platina घेऊन मी सकाळीच यवत च्या दिशेने निघालो.  यवत हे पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग 65 वर वसलेले गाव आहे.  तसे बघितल्यास हा भाग प्रचंड संपत्ती आणि समृद्धी चा दिसतो. रस्त्याने जात असताना सगळीकडे दिसणारी हिरवळ (  शेतातील म्हणतोय) मन प्रसन्न करणारी आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात फुलांच्या नर्सरी दिसल्या.  त्या नर्सरी  मधील विविध रंग बेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.  यवत ला पोहोचल्यावर आत मध्ये २-३. किलोमिटर वर तांबेवाडी गांव आहे. त्या गावात शिरताना सगळीकडे दिसणारे उसाचे मळे, त्या भागातील समृद्धीची साक्ष देतात. ऊस आणि त्याला अनुषंगाने असणारे कारखाने हे तेथील शेतकऱ्यांच्या संपन्नतेचे  मुख्य कारण आहे. ऊस तसं प्रतिष्ठेचे आणि आर्थिक उत्पन्नाचे सा

पेरकुंड

 पेरकुंड(चिपाड) ✍🏻 सौरभ हटकर  09 जून ला मी 27 वर्षाचा झालो... मग सहज आई जवळ बसून मी  माझ्या जन्माची कथा तिला विचारली.  तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.... ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे... ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती . तर फरक पडला नसता..ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्री ला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी  एका वनवासाची आहे....... आई म्हटली "तु पोटात व्हता तव्हा म्या गावातंच हुती.....  वाड्यावं(बिऱ्हाड किंवा तांडा) तव्हा बिजा अन दादा असायची(काकू अन काका).... कधी मी जायची" मी म्हटलं मंग माझा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला.......? आई म्हणाली "तुमा सगळ्याचाच जल्म असाच घरी किंवा वाड्यावं झाला,दवाखानं-बिवाखानं अन तिथं बाळांतंणं आपल्या बायाना नव्हती माहित. अन म्हणून तुया जल्मही बाबाच्या(आजोबाच्या)खोलीत झाला."  मी कुठं तरी वाचलं होतं.....  बाळंतण होतांना शरीरातील 28-29 हाडं मोडतील एवढा त्रास होतो.  मी लगेंच आईला विचारलं "पेन किलर खायची का"?  तिला पेन किलर काय आहे.  हे आजही माहिती नाही.  "तसांच दम धरत जल्म द्या

Cultural Nationalism Of ahilyadevi holkar

Image