'अनहायजेनिक' गावाचं हायजेनिक प्रेम.
(कथा पुर्ण वाचली पाहिजेतंच) खरंतर सुमन ला गावाकडच्या सासर ला जायचा कंटाळाच यायचा.... उन्ह्याळ्याची सुट्टी लागली की पहिली धडधड सुमनला वाटायची,ती याचीच की आता गावाकडे जायचंय....... तीची चिडचिड अजय ला स्पष्ट जाणवायची..... तरीही अजय तिच्या बोलण्याला फारसा गंभीरतेने न घेता एक दोन दिवसांकरीता का होईना....लेकरांनासोबत घेऊन गावांत जायचा. अजय सुमनचा नवरा....दोघेही एकाच कंपनीत नौकरीला होते....तिथे दोघांचं प्रेम आणि प्रेमाचं नंतर लग्नात रूपांतर झालं. अजय ग्रामिण भागातला होतकरू तरूण होता.... त्याने शिवार-वावारापासून आपला प्रवास हिंजेवाडीच्या चकचकीत इमारती पर्यंत केला होता. तर सुमन ही सावळी पण प्रसन्न रूपाची होती. तिचं स्वतंत्र व्यक्तीमत्वाने अजय ला भुरळ घातली होती. तीच्या निर्णय क्षमतेचा तो दिवाणा होता, तर अजय च्या नम्रतेने ती दिवाणी झाली होती. तुलनेने सुमन शहरी असल्याने तिला गावगाडा फारसा कधी रमणीय वाटला नाही. अगदी तिच्याच शब्दात गावगाडा तीला प्रचंड अनहाईजेनिक वाटायचा. म्हणून सुट्ट्या आल्या की ,सुमन ला चिंता वाटायची.ती तिच्या लेकराच्या म्हणजे राहूल च्या आरोग्याची. गावामधे