आपण ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी.....?
आपण ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी ....? आज जरा करमत नव्हतं....म्हणजे हा न करमण्याचा प्रोग्राम बरेच दिवस झालाय ,असाच चालू आहे..... त्यामुळे ना कुणाशी बोलावसं वाटत न कुणी जवळच वाटत .....काही लिहावसं वाटत नाही....कुठं फिरावसं वाटत नाही.....(बाकी ते प्रेम,प्रेयसी हे विषय त आपल्या आयुष्याचा भागच नाहीत)..... सतत एकटेपणाची जाणिव मनाला खचवत असते...... अशा वेळी आजूबाजूच्या वातावरणाचा आणि चालू घडामोडीचा श्येड्यूल सुद्धा ठीक पचवल्या जात नाही .....पण मग थोडं चिंतन केलं ,की मनातले कच्चे पक्के दुवे कळायला लागतात.........आणि समजायला लागतं...की अरे आपल्या एकटेपणाची जाणिव आपणच ठरवून निर्माण केलेली असते......आपण ठरवून टाकलेली असते चौकट....की हे असेच होनार किंवा मी हे करूच शकणार नाही... नव्हे आपण ठरवलेली असते एखादी व्यक्ती,गोष्ट,वस्तु.आपल्या अनमोल जिवनाचा अविभाज्य भाग म्हणून...... किंवा ठरलेल्या असतात आपल्या बसायच्या,झोपायच्या जागा ,class/office चे तेच रस्ते तेच routine.... ईतकेच नव्हे तर ठरवलेल्या असतात आपण आपल्या स्वतःच्या सवयी,विचार,पद्धतींच्या चौकटी,ice cream flavour पासून तर भ