Posts

Showing posts from July, 2018

विकास महात्मे साहेब समाजाविरूद्ध अविकसित राजकारण करू नका..* *सामाज भोळा आहे ...येडा नाही...* निर्यातबंदी पुर्वनियोजितच होती....

* ⭕मेंढपाळपुत्र आर्मी⭕ काही दिवसां पुर्वी  नाशिक ते मुंबई शेतकर्यांच्या विविध मागणींसाठी शेतकर्यांनी शिस्तीत अन शांततेत लाँग मार्च काढला, पुणे ते मुंबई स्पर्धा परीक्षेतील विविध घोटाळ्यांविरूद्ध आणि जागाभरतीबाबत विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढला,पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे शेकडो मुले मेलीत तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात लढत होत्या,ए.स टी कर्मचार्यांचा बंद असोकी धनगर-मराठा आरक्षण लढा असेल  असे अनेक उदाहरणे देता येतील की जेथे लाखो लोकं आपल्या मागण्यांसाठी लढत होती. पण सरकार कधी शेतकर्यांत माऔवादी तर कधी विद्यार्थांत डावे शोधत होते..एकंदरीत सरकार आम्ही किती पक्के आहोत अन तुमच्या मागण्यांसमोर न झुकणारे आहोत अशीच भूमिका ठासून घेतांना दाखवित होते. हे सर्व सांगायचे कारण की डाॕ रीचा जैन नामक अल्पज्ञानी व्यक्तीने मुठभर लोकांसोबत नागपुरात 'बोकड निर्याती'विरूद्ध आंदोलन काय केले? सरकार ने कित्येक मंत्र्याच्या उपस्थित होणारा आणि विशेषतः सोशिअल मेडियावरा विशेष झगमगाटी प्रसिद्धी करून स्वतःचे तथाकथित महात्म्य धनगर समाजावर थोपविणारे डाॕ विकास महात्मे यांनी तो