तोडुन फेकायच्या आधी सन्मानामने गळुन पडु.....
ताज तवानं फुल बघितल की मन कसं प्रसन्न राहतं............ त्या सोबतंच वेळ जावा...त्याच्या सुगंधाच्या सहवासातच राहावं..अस वाटन नैसर्गिकच असत.... पण तेच फुलं झुरमुसलेल शिळं असले तर...??? ते तितकंच नकोस वाटतं....... का..??? कारण ते सुकलेलं असतं....... त्यात नाविन्य किंवा हुरहुर माजविनारं कुतुहुल नसतंच..... नेमकं नात्यांच असंच आहे...... सुरुवातीला जेव्हा ते नवीन असतं तेव्हा ते आकर्षकच व हवहवंसच वाटतं..... त्याचा सहवास मिळो अथवा न मिळो पण सहवासाचे स्वप्नही खुपच रमणीय असतात.,,, तिच्या आठवणीच्या काळातील हुरहुरीची तिव्रता मनाला कंपनाचे तिव्र धक्के देणारी असतात.... फुलाविन सुगध अन सुगंधाविन फुल हा formulaजसा वर्क करत नाही....तसा तुजविन मि आणि माझ्याविन तु......हे ही शक्य नाही अशा अविर्भावात जगण्याचा तो काळ असतो.... पण जसा जसा काळ जातो तसा तसा त्यातल्या जिव्हाळ्याचा दर्पही सुकुन ते शिळं वाटाया लागतं. त्याला कारणंही अनेक असतात....करीयर,स्वप्न किंवा त्याच्या किंवा तिच्या आयुष्याच्या वेलीवर ऊगवलेलं आणखी एखादं दुसरं नविन फुल.................. अशावेळी जुन्या फुलाने त्या फांदीवर राहायचा