निसर्गाचा समतोल साधून करावा विकास
कुठल्याही देशाचे उत्तम रस्ते हे विकासाचे चाके म्हणून ओळखल्या जातात. औद्योगिक मालाचे दळणवळण,पर्यटन,वेगवेगळ्या भागांची कनेक्टीविटी म्हणून रस्त्यांचे महत्व अबाधितच आहे.भारतासारख्या विकसनशील देशांमधे तर जेवढे रस्त्यांचे नेटवर्क मजबूत तेवढा अंतर्गत विकास झपाट्याने घडवून आणता येतो.त्यामुळे रस्ते व्हायला पाहिजेतच..... पण निसर्गाचा,जैवविविधतेचा,आणि पर्यायाने पर्यावणाचा ह्रास करून होणारे रस्ते हे विकासाचे माॕडेल होऊ शकत नाही.भग्न अन सिमेंटची जंगले शाश्वत विकासात येत नाहीत.त्यामुळे वृक्षतोडीचा असाच प्रयत्न खामगांव-शेगांव रस्ता चौपदरीकरणात होणार तर नाही ना? अशी शंका मनात निर्माण झाल्यामुळे हा लेख प्रपंच... काही वर्षापुर्वी खामगांव-जालना महामार्ग चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल केल्या गेली. नाममात्र भावात झाडांचा लिलाव करून,दशकांची नैसर्गिक संसाधाने असलेली अमुल्य झाडे खिरापतीत वाटल्या सारखी विकून तोडली. भरपाई म्हणून कुठल्याही प्रकारची झाडं कुठेच लावल्या गेली नाही. आणि निर्दयतेचा कळस म्हणावा की काय???त्याच जून्या रस्त्याच्या आजूबाजूला मोठंं खोदकाम करून,ते तसंच पेंडींग ठेवल्या गेलं.त