नेहरूजी तुम्ही खरंच देशाचं वाटोळं केलं..*
* .......वर्ष भरापुर्वीचा लेख ✍🏻सौरभ हटकर 14 aug 1947 साली घटना समितीसमोर बोलतांना नवभारताचा केलेला दृढनिश्चय किंवा देशाला लालकिल्ल्यावरून देशाला दिलेली दिशा...आणि त्या साठी जवळपास 2 दशक केलेले कष्टामुळेच देशाचं वाटोळं झालं नेहरूजी.... अहो जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं..."देडसो साल अंग्रजोने इस देश कु लुटा है...ये सब पाप अंग्रेजो का है" असल्या थापा मारून तुम्ही जनतेला भावूक भ्रामक करू शकला असता . पण नाही तुम्ही घटना समितीसमोर "जेव्हा आपण जून्यातून नव्यात प्रवेश करतो,जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि जेव्हा राष्ट्राचा बराच काळ दडपलेला आत्मा व्यक्त होतो.अशा गंभीर क्षणी आपण भारताच्या आणी भारतीय जनतेच्या सेवेला तसेच त्याहून अधिक महान अशा मानवतेच्या कार्याला ,वाहून घेण्याची प्रतिज्ञा करणे उचित राहील" असे बोलून तुम्ही नवभारताविषयी उदार आणि व्यापक आकांक्षा मांडल्या हे चुकलंच. नेहरूजी गांधी हत्या ही विशिष्ट विचारसरणीच्या विशिष्ट संघटनेच्या विखारी प्रचारामुळे झाली म्हणून तुम्ही त्या संघटनेवर तात्पुरती बंदी आणली. पण ही बंदी कुणाचे विचार स्वातंत्र्य हिरावू