Posts

Showing posts from 2019

CAA-NRC:-संभ्रम,संशय,भीती. सर्वंकष .

Image
सिटीझनशीप अँमेन्डेमेंट ऍक्ट  (CAA) मुळे देशभरात संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. भारतीय राजधानी असलेल्या दिल्ली मधे या आन्दोलनाने उग्र रूप धारण केलेले असून ,पाहता पाहता या आंदोलनाची धग संपूर्ण देशभर पसरलेली आहे . महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापुर मराठवाड्यातील काही भागामधे सुद्धा CAA बाबत आंदोलने झाले आहेत सोबतच अन्य ठिकाणी सुद्धा  होत आहेत. काही काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक रूप धारण केले,कुठे विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलने केली तर कुठे पोलिसांकडून सुद्धा हिंसा झालेली फुटेज बघायला मिळत आहेत .कुठल्याही आंदोलनांमधे हिंसा होणे ,समर्थनीय नसून ,त्यामुळे आंदोलनाची धार च बोथट होत असते . social media वर सुद्धा प्रो कायदा -कायद्याच्या विरुद्ध बाजू  ताकदीने   मांडल्या जात आहेत . यात कायद्याच्या बाजूने आणि विरोधात निघालेल्या अनेक मोर्च्यांमध्ये  दोन्हीही   बाजूच्या लोकांना ,काही पत्रकारांनी caa बाबत प्रश्न विचारले असता ,त्यांना CAA म्हणजे काय आणि कोणत्या कारणासाठी विरोध करत आहात??कोणत्या कारणासाठी समर्थन करीत आहात  ? हेही सांगता आलेलं नाही ..(याबाबत फरहान अख्तर यांचा vdo

लोडशेडींग आणि गावगाडा....

पुर्वी.... गावामधे भारनियमन असायचे...गावात कोणी त्याला लोडशेडिंग तर कोणी लोडशिटींग म्हणतात ... साधारणतः 6-6 तासाचे लोडशेडिंग तेव्हा  असायचं... सायंकाळी 5-6 दरम्यान लाईन जायची तर थेट मध्यरात्री 12 नंतरच यायची.... पौर्णिमेचा लख्ख चंद्र जणू गावाला प्रकाशित करायचा, तर अमावसेच्या रात्री "चुर-चुर-चुर" करणारी रातकिडे त्या अंधाराला अजून भयाण करायचे. दरम्यान गावातल्या बाया बापड्या आपली कामं लवकर आटोपून एकमेकांच्या ओट्यावर जाऊन  बोलंत बसायच्या, तर कुठे रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या ट्रॕक्टरवर  किंवा मंदिराच्या ओट्यावर  बसून युवकांचे घोळके 'रसभरीत' चर्चा करीत रमलेली असायची. तर कुणी रात्री लाईन आल्यावर वावरांत पाणी द्यायला जायचं या ताणात राहायची. बुजुर्ग बिचारी आपली बाहेर बाजा,खाटा टाकून त्यावर नातवं खेळवायची. गावांत दुर कुठेतरी कोणत्या तरी कोपऱ्यात एखाद्या जवळच असणारा Everyday च्या सेल वर चालणाऱ्या  रेडिओवरून.. आकाशवाणी अकोल्याच्या केंद्रावरून प्रसारीत घडामोडी....गावातील काळोख आणि शांतता चिरत कानावर पडायच्या. बर्याचदा रेडिओ वर ठरलेली गाणीही असायची,जशी की बिंदिया चमक

'दीन' अभियंता.

भारतरत्न सर  मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.visvesvaraya). यांच्या स्मरणार्थ 15  sept हा त्यांचा जन्मदिवस  अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो. विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते होते,त्यांची विशेष ओळख ही त्यांच्या संशोधनात्मक dam construction&water irrigation च्या निर्माण केलेल्या प्रणाली बद्धल आहे. त्यांच्या संशोधनामुळे  मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचले  आणि त्याचा   परीणाम सभोवातालच्या परीसरातील लोकांची तहान भागवून ,शेती सिंचनासाठीही  झाला. हैद्राबाद शहराला पुरापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या 'फ्लड प्रोटेक्शन सिष्टम' ने विश्वेश्वर्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले होते.1912-1918 च्या दरम्यान म्हैसुरचे दिवाण म्हणून काम करणाऱ्या विश्वेश्वर्यांनी भारताच्या आर्थिक नियोजनाचा पायाही घातला होता.सन 1934 साली त्यांनी 'Planned Economy in India'  हे पुस्तक लिहीले.यालाच  'Sir M. Visvesvaraya plan'  ही म्हणतात. ब्रिटिश कालीन भारतात जन्मलेल्या  या जिज्ञासू व्यक्तीने आपल्या संशोधनाच्या बळावर ईतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घेण्यास भाग