प्रति, अमृताजी फडणवीस मॕडम..... महाराष्ट्रातील गड किल्ले सरकारने भाड्याने द्यायचे ठरवले असता...महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी गडप्रेमींनी त्या निर्णयांस विरोध केलां आहे..अन तो करायलाही हवांय..शेवटी गड किल्ले हि महाराष्ट्राची अस्मिता आहेत....त्यांना चंगळबाजीचा वारसा नसून,शौर्य व स्वाभिमानाचा वारसा आहे....म्हणून ते जर चंगळबाजीसाठी भाड्याने द्यायचे सरकार ठरवत असेल तर सरकारला विरोध करायलाच पाहिजेत आणि तो तसा झालाही.... पण त्या गडकिल्ल्यांच्या निर्णयावरून ट्रोल मात्र तुम्ही झालांत....अर्वाच्च्य भाषेमधे मात्र आपल्या बद्धल लिहीलं गेलं..... दुर्दैवाने शत्रूच्या स्त्रीचाही सन्मान करणारे छत्रपती शिवराय यांचा वारसा सांगणाऱ्या काहींनी भावनेच्या भरात तुमच्या बाबत मात्र अतिशय गलिच्छ लिहून ट्रोल केले...... खरंतर त्या निर्णयात तुमचा रोल काय??हा एक प्रतिप्रश्न मी एका ग्रुप वर अशाच एका व्यक्तीला विचारला असता....त्याला तेथे उत्तर देता आले नाही....पण झालेला प्रकार हा निंदणीय आहे . तुम्हची विचारधारा अन माझी विचारधारा वेगवेगळी आहे...पण माझ्या नजरेत तुम्ही मुख्यमंत्री असलेल्...